स्वच्छ भारत अभियान (Swaccha Bharat Abhiyan)

स्वच्छ भारत अभियान (Swaccha Bharat Abhiyan)

अभियानाची सुरुवात – स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014 रोजी महात्मा गांधीजींच्या 145 व्या जयंती दिवशी दिल्लीमधील वाल्मीकीनगरमधून करण्यात आली.

अभियानाचे उद्देश – प्रत्येक गल्ली, इलाका, रस्ते 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ करणे.

*स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही पूर्वीच्या निर्मल भारत अभियानाची पुनर्रचना करून करण्यात आली आहे.

स्वच्छ भारत अभियान दोन टप्प्यांत विभागण्यात आले.

स्वच्छ भारत अभियान ग्रामीण – हे अभियान केंद्रीय पेंयजल व स्वच्छता मंत्रालयाव्दारे राबविण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत अभियान शहरी – हे अभियान केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाव्दारे राबविण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत अभियानाचा प्रमुख उद्देश – सन 2019 पर्यंत (गांधीजींच्या 150 व्या जयंतीपर्यंत) देशातील स्वच्छतेची पातळी वाढवून संपूर्ण देश स्वच्छ करणे.

*स्वच्छ भारत अभियान पूर्ण करण्यासाठी सरकारने सर्व जनतेस विनंती केली आहे की, ते आपल्या जवळील व दुसर्‍या जागेतील स्वच्छतेसाठी वर्षामध्ये फक्त 100 तास स्वच्छतेसाठी द्या.

स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यासाठी धोरण आणि काही प्रक्रिया आहेत ज्यामध्ये तीन टप्पे आहेत.

1. योजना टप्पा

2. कार्यवाही टप्पा

3. सातत्य टप्पा

काय आहे स्वच्छ भारत अभियान?

1. स्वच्छ भारत अभियान एक राष्ट्रीय स्वच्छता मोहीम आहे, जी भारत सरकारमार्फत सुरू करण्यात आली आहे.

2. या अंतर्गत 4041 शहरांचे रस्ते, फुटपाथ मार्ग आणि इतर ठिकाणे समाविष्ट होतात.

स्वच्छ भारत अभियानाची गरज

1. हे आवश्यक आहे की, भारताच्या प्रत्येक घरामध्ये शौचालय असणे, त्याचबरोबर उघड्यावर शौचास बसण्याची प्रवृत्ती समाप्त करण्याची गरज आहे.

2. हातामार्फत करण्यात येणारी साफसफाईची व्यवस्था मुळापासून समाप्त करणे.

3. महानगरपालिकेच्या कचर्‍याचे योग्य निर्मूलन व त्याचा पुन्हा योग्य वापर, सुरक्षित विल्हेवाट, वैज्ञानिक पद्धतीने मल व्यवस्थापन करणे.

4. स्वत:च्या आरोग्यासंबंधी भारतीय जनतेच्या विचार व स्वभावामध्ये बदल करणे. त्याचबरोबर आरोग्यपूर्ण साफसफाई प्रक्रियेचे पालन करणे

5. याअंतर्गत काम करणार्‍या व्यक्तींनी स्थानिक पातळीवर कचर्‍याची विल्हेवाट लावणे.

6. ग्रामीण क्षेत्रामध्ये राहणार्‍या लोकांमध्ये जागतिक पातळीवरील जागरुकता निर्माण करण्यासाठी व सामान्य जनतेस आरोग्यपूर्ण जीवनाशी जोडण्यासाठी या अभियानाची गरज आहे.

7. संपूर्ण भारतामध्ये साफसफाईची सुविधा विकसित करण्यासाठी खासगी क्षेत्राची भागीदारी वाढविणे

8. भारतास स्वच्छ बनविणे

9. ग्रामीण भागामध्ये जीवनस्तराच्या गुणवत्तेमध्ये बदल घडवून आणणे.

10. आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून समुदाय व पंचायती राज्य संस्थेस सतत साफसफाई संबंधी जागरूक करणे.

11. कोरड्या शौचालयांचे रूपांतर पाण्याच्या स्त्रोतांचा वापर असणार्‍या शौचालयात करणे.

12. सामुदायिक स्वच्छतागृह बांधण्यामध्ये सार्वजनिक खासगी भागीदारीस प्रोत्साहित करणे.

शहरी भाग स्वच्छ भारत अभियान –

1. शहरी भागामध्ये स्वच्छ भारत अभियानाचे लक्ष्य प्रत्येक शहरामध्ये कचरा व्यवस्थापनाबरोबर सरासरी सर्व 1.04 कोटी घरांना 2.6 लाख सार्वजनिक शौचालय, 2.5 लाख सर्वाधिक शौचालय उपलब्ध करणे हे आहे.

2. सार्वजनिक शौचालयाच्या निर्मितीची योजना झोपडपट्टी भागामध्ये करण्यात आली आहे, ज्या ठिकाणी वैयक्तिक शौचालयाची सुविधा अवघड आहे. अशा प्रकारे सार्वजनिक शौचालयाची सार्वजनिक ठिकाणी (बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजार) गरज असते.

3. शहरी भागामध्ये स्वच्छता कार्यक्रमास पाच वर्षांच्या आत 2019 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. यामध्ये मोठा कचरा व्यवस्थापन खर्च सरासरी 7.366 कोटी रु. आहे. 1.828 कोटी रु. सर्वसामान्यांस जागृत करण्यासाठी आहेत. 655 कोटी रु. सार्वजनिक शौचालयांसाठी व 4.165 कोटी रु. खासगी घराअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी इ. याअंतर्गत पुढील लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

i. उघड्यावरील शौच प्रवृत्ती समाप्त करणे

ii. कोरड्या शौचालयाचे रूपांतर पाण्याच्या स्त्रोतांचा वापर असणार्‍या शौचालयात करणे

iii. मोकळ्या हाताने साफसफाई प्रवृत्ती बंद करणे

iv. व्यक्तींच्या विचारसरणीमध्ये बदल घडवून आणणे.

ग्रामीण स्वच्छ भारत मिशन –

*ग्रामीण स्वच्छ भारत मिशन एक असे अभियान आहे, ज्यामार्फत ग्रामीण भारतामध्ये स्वच्छता कार्यक्रम राबविले जातात ग्रामीण भाग स्वच्छ बनविण्यासाठी 1999 मध्ये भारत सरकारने निर्मल भारत अभियानाची सुरुवात केली होती. त्याचे रूपांतर स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) मध्ये करण्यात आले आहे.

*ग्रामीण स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश-ग्रामीण भागातील व्यक्तींची उघड्यावरील शौच करण्याची प्रवृत्ती समाप्त करणे. त्यासाठी सरकारने 11 कोटी 11 लाख शौचालये बांधण्यासाठी 1,34,000 कोटी रु. खर्च करण्याचे नियोजन केले आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) लक्ष्य –

1. ग्रामीण भागातील व्यक्तींच्या जीवनस्तरामध्ये सुधारणा करणे

2. 2019 पर्यंत स्वच्छ भारताचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये साफसफाईसाठी प्रेरित करणे.

3. गरजेच्या साफसफाईच्या सुविधा सतत उपलब्ध करण्यासाठी पंचायती राज्यसंस्था, समुदाय इत्यादींना प्रोत्साहित करणे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जोडल्या गेलेल्या प्रसिद्ध व्यक्ती –

अमिताभ बच्चन

आमीर खान

ऋतिक रोशन

सचिन तेंडुलकर

मृदुला सिन्हा

अनिल अंबानी

बाबा रामदेव

शशी थरूर

कमल हसन

प्रियंका चोपडा

सलमान खान

अमित शाह

एम. वेंकय्या नायडू

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ची टीम

स्वच्छ भारत अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी आमंत्रित व्यक्ती –

सचिन तेंडुलकर

कमल हसन

मृदुला सिन्हा

अनिल अंबानी

बाबा रामदेव

शशी थरूर

प्रियंका चोपडा

सलमान खान

तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेची टीम

*स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह (Logo) कोल्हापूरच्या अनंत खासबारदार यांनी तयार केले आहे. हे बोधचिन्ह तयार करण्यासाठी बक्षीस म्हणून 50,000 रु. देण्यात आले.

*स्वच्छ भारत अभियानाचे “एक कदम स्वच्छता की ओर” हे घोषवाक्य गुजरातमधील राजकोटमधील भाग्यश्री सेठ यांनी तयार केले. त्यासाठी त्यांना बक्षीस स्वरुपात 25,000 रु. देण्यात आले.

*स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख – जयंत नारळीकर

*स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅंड अम्बेसिडर म्हणून क्रिकेटर व्ही.व्ही. लक्ष्मण व बालसुब्रमण्यम यांची निवड करण्यात आली आहे, तर महाराष्ट्रातील ब्रॅंड अम्बेसिडर म्हणून अविनाश धर्माधिकारी व मकरंद अनासपूरे निवड करण्यात आली आहे.

स्वच्छ भारत अभियानाचे महत्व –

1. स्वच्छ भारत अभियान भारत सरकारमार्फत 404! जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी सुरू करण्यात आले.

2. स्वच्छ भारत अभियानाचा एकूण खर्च 62,009 कोटी रु. आहे, ज्यामधील 14,623 कोटी रु. केंद्र सरकारव्दारे दिले जातील.

3. 2019 पर्यंत भारतामध्ये सर्व ठिकाणी पक्की शौचालये बांधणे.

4. 2019 पर्यंतसर्व ठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करणे.

स्वच्छ भारत अभियान अनुदान –

1. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्तिक घरगुती शौचालये बांधण्यासाठी 12,000 रु, अनुदान वाटप करण्यात येते. त्यापैकी

2. केंद्र सरकारचा हिस्सा 90000 रु., राज्य सरकारचा हिस्सा 3000 रु. (केंद्र 75% व राज्य 25% हिस्सा)

3. पूर्वेकडील राज्यांत केंद्राचा हिस्सा 10,800 रु. राज्य सरकार 1200 रु. (केंद्र 90% व राज्य 10% हिस्सा)

4. ग्रामीण भागातील खुले मलमूत्र विसर्जन संपवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीस 20 लाख रु. वार्षिक अनुदान मंजूर करण्यत येईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.