STI Pre Exam Question Set 26

STI Pre Exam Question Set 26

1. दोन रेखावृत्तातील सर्वात जास्त अंतर विषुववृत्तावर —– कि.मी. असते.

  1.  110
  2.  115
  3.  105
  4.  120

उत्तर : 110


2. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र —— येथे आहे.

  1.  पेंच
  2.  मणिकरण
  3.  कोयना
  4.  मंडी

उत्तर : मणिकरण


3. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  1.  मुल्क राज आनंद
  2.  शोभा डे
  3.  अरुंधती राय
  4.  खुशवंत सिंग

उत्तर : शोभा डे


4. नियोजित आलेवाडी बंदर —— जिल्ह्यात आहे.

  1.  सिंधुदुर्ग
  2.  ठाणे
  3.  रत्नागिरी
  4.  रायगड

उत्तर : ठाणे


5. —– शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

  1.  मुंबई
  2.  बंगलोर
  3.  कानपूर
  4.  हैदराबाद

उत्तर : बंगलोर


6. ताशी 36 कि.मी. वेगाने धावणारी आगगाडी एक खांब 20 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

  1.  20 मीटर
  2.  200 मीटर
  3.  180 मीटर
  4.  360 मीटर

उत्तर : 200 मीटर


7. मुंबई उच्च न्यायालयाची —– खंडपीठे आहेत.

  1.  दोन
  2.  तीन
  3.  चार
  4.  एक

उत्तर : तीन


8. राज्याचा आकस्मिक निधी —— च्या अखत्यारीत असतो.

  1.  राज्यपाल
  2.  मुख्यमंत्री
  3.  मंत्रीपरिषद
  4.  राज्यविधानमंडळ

उत्तर : राज्यपाल


9. स्पायरोगायरा —– शेवाळ आहे.

  1.  नील-हरित
  2.  हरित
  3.  लाल
  4.  रंगहीन

उत्तर : हरित


10. —— वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

  1.  नायट्रोजन
  2.  अमोनिया
  3.  हेलियम
  4.  कार्बन डाय-ऑक्साइड

उत्तर : कार्बन डाय-ऑक्साइड


11. हिर्‍याचा अपवर्तनांक किती?

  1.  1.5
  2.  1.6
  3.  2.42
  4.  1.33

उत्तर : 2.42


12. महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या —— आहे.

  1.  250
  2.  266
  3.  288
  4.  278

उत्तर : 288


13. 60 आणि दुसरी एक संख्या यांचा म.सा.वि. 12 आहे आणि त्यांचा ल.सा.वि. 240 आहे. दुसरी संख्या शोधा.

  1.  4
  2.  48
  3.  720
  4.  20

उत्तर : 48


14. इ.स. 1920 साली रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्याबाबतीत भारताचा जगात —— क्रमांक होता.

  1.  4
  2.  7
  3.  2
  4.  5  

उत्तर : 4


15. —— हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.

  1.  दिनबंधु
  2.  दिन मित्र
  3.  दलित मित्र
  4.  दलित बंधु

उत्तर : दिनबंधु


16. गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला?

  1.  मानवतावाद
  2.  समाजवाद
  3.  बुद्धीप्रामाण्यवाद
  4.  सर्वकषवाद

उत्तर : बुद्धीप्रामाण्यवाद


17. गोपाल गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?

  1.  मराठा
  2.  केसरी
  3.  ज्ञानप्रकाश
  4.  दर्पण

उत्तर : केसरी


18. शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला?

  1.  आर्य समाज
  2.  सत्यशोधक समाज
  3.  प्रार्थना समाज
  4.  ब्राम्हो समाज

उत्तर : सत्यशोधक समाज


19. ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक कोणी लिहिले?

  1.  लोकहितवादी
  2.  आगरकर
  3.  विठ्ठल रामजी शिंदे
  4.  महात्मा फुले

उत्तर : महात्मा फुले


20. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते —–

  1.  अॅनी बेझंट
  2.  लोकमान्य टिळक
  3.  बॅरिस्टर खापरडे
  4.  डॉ. बी.एस. मुंजे

उत्तर : लोकमान्य टिळक

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.