‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना
‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना
- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्याच्या महिला आणि बालविकास खात्याने ‘बेटी बचाओ , बेटी पढाओ’ अंतर्गत भाग्यश्री योजनेचा शुभारंभ दि. 8 मार्च 2014 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला.
- 1 जानेवारी 2014 रोजी आघाडी सरकारने सुकन्या योजना सुरू केली होती. त्यामध्ये बादल करण्यात आलेला असून आता ही योजना भाग्यश्री सुकन्या योजना असेल.
- फक्त एकच मुलीच्या जनमचे स्वागत करण्यासाठी सरकारतर्फे 5 हजार रुपये दिले जाणार आहेत.
- त्यानंतर ती 5 वर्षाची होएपर्यंत प्रतिवर्षी 2 हजाराप्रमाणे 10 हजार ,प्राथमिक शिक्षणासाठी प्रतिवर्षी 2500 प्रमाणे 4 वर्षकरिता 10 हजार, मुलीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रतिवर्षी 3 हजाराप्रमाणे 8 वर्षासाठी 24 हजार रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
- एका मुलींनतर दुसरी मुलगी जन्माला घातल्यास आणि कुटुंबानियोजणाची हमी दिल्यास दुसर्या मुलीसाठी अनुक्रमे 2500, 5000, 1600 रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून ज्या गावांमध्ये वर्षभरात मुलीचा जन्मदर मुलांच्या जन्मदारपेक्षा जास्त असेल त्या गावांना प्रत्येक वर्षी 5 लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.