ई-नाम योजना (E-NAM Yojana)

ई-नाम योजना (E-NAM Yojana)

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 14 एप्रिल 2016 रोजी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवस) राष्ट्रीय कृषी बाजार नाम (National Agricultural Marketing) योजनेअंतर्गत ई-मंडी (e-NAM) चे उद्घाटन करण्यात आले.

Must Read (नक्की वाचा):

आधार बिल योजना (Aadhar Bill Yojana)

ई-नाम योजनेचा उद्देश –

1. शेतकर्‍यांना शेतमालाची योग्य किमत प्राप्त करून देणे.

2. ई-नाम योजनेचा फायदा केवळ शेतकर्‍यांनाच नव्हे, तर ग्राहक आणि घाऊक व्यापर्‍यांनाही घेता येईल.

3. ई-नाम योजनेमुळे शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दलालांची मध्यस्थी कमी होण्यास मदत होणार आहे.

4. ई-नाम योजना प्रयोगिक तत्वावर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाणा, झारखंड, हरियाणा व हिमाचल प्रदेश या राज्यांतील 21 ठोक मंडी बाजारात शेतकरी आपल्या 25 कृषी उत्पादन वस्तू विक्री करू शकतील.

ई-नाम योजनेचे लक्ष्य –

1. सरकारव्दारे मार्च 2018 पर्यंत देशातील 585 मंडी ई-मंडी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

2. ई-नाम योजना लागू केल्यानंतर शेतकर्‍यांना आपला माल कुठे विकावा, किती किमतीला विकावा हे ठरविण्याचा अधिकार मिळणार आहे.

3. ई-नाम योजनेअंतर्गत मंडी बाजार हा ऑनलाईन करण्यात येईल.

4. ई-नाम योजनेअंतर्गत 1,60,229 शेतकरी, 46,688 व्यापारी व 25,970 कमिशन एजेंटंना अधिकृत करण्यात आले आहे.

5. ई-नाम योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा व प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी प्रति मंडी 30 लाख रुपयांची मदत रक्कम उपलब्ध करण्यात येईल.

6. ई-नाम योजनेअंतर्गत ई-नाम सॉफ्टवेअर व एका वर्षासाठी माहिती तंत्रज्ञान अधिकारी ही उपलब्ध करण्यात येतील.

Must Read (नक्की वाचा):

सहज योजना (Sahaj Yojana)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.