Current Affairs (चालू घडामोडी) of 28 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. एक हजार कोटींची नागरी परिवहनासाठी तरतूद
2. कॉग्रेस निवडणार आपला नवीन अध्यक्ष
3. वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ घरी जाऊन देणार राष्ट्रपती
4. ‘इस्त्रों’ला गांधी पुरस्कार जाहीर
5. दिनविशेष

एक हजार कोटींची नागरी परिवहनासाठी तरतूद :

  • मुंबईतील नागरी परिवहन प्रकल्पासाठी सर्वाधिक एक हजार पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा नव्या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 832.30 कोटींच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी मंजूर करण्यात आले आहे.
  • मुख्यमंत्री व प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत 2015-16 या वर्षातील अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

कॉग्रेस निवडणार आपला नवीन अध्यक्ष :

  • अखिल भारतीय कॉग्रेस कामिटीत 30 सप्टेंबर रोजी कॉग्रेसचा नवीण  अध्यक्षासाठी  निवडणुका होणार  आहे.
  • यासाठी प्रथमच कॉग्रेसने दोन टप्प्यात संघटनात्मक निवडणुका घेण्याचे ठरवले आहे.
  • 31 जुलैपर्यंत गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, केरळ आणि काही ईशान्य राज्यांसह 18 राज्यांचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे.
  • तर दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, झारखंड, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा या राज्यांत निवडणुका होतील.
  • सोनिया गांधी या सर्वात जास्त काळ पक्षाध्यक्षपदी राहणार्‍या नेत्या बनल्या आहेत त्या 1998 पासून पक्षाध्यक्षपदी आहेत.
  • राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी आणि अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सदस्यांची निवडणूक 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान होईल.

वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ घरी जाऊन देणार राष्ट्रपती :

  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न‘ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी  अटलबिहारी वाजपेयीना त्यांच्या निवास्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
  • 25 डिसेंबर ला वाजपेयी आणि मालवीय यांना ‘भारतरत्न’ जाहीर झाले होते.

‘इस्त्रों’ला गांधी पुरस्कार जाहीर :

  • गांधी शांतता पुरस्कार 2014 साठी भारतीय आकाश संशोधन संस्थेची (इस्त्रों)निवड करण्यात आली आहे.
  • आकाश तंत्रज्ञान आणि उपग्रह सेवांव्दारे देशाचा विकास करण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल या संस्थेला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • एक कोटी रुपये, आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • पुरस्काराची सुरवात 1995 मध्ये झाली आहे.
  • याअधी नेल्सम मंडाले, बाबा आमटे, बांग्लादेशची ग्रामीण बँक, तसेच रामकृष्ण मिशन यांना पुरस्कार देण्यात आले आहेत.

दिनविशेष :

  • 2000 – वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज कोर्टणी वॉल्शचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम. त्याने 435 वा बळी मिळवून भारताचा माजी कर्णधार कपिलदेवचा 434 बळींचा विक्रम मोडला.
  • 2000 – फाय फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘राष्ट्रभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना जाहीर.
  • 2004 – सर्वात वेगवान चालकरहित जेट विमान तयार करण्यात अमेरिकेचा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेटला यश.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.