20 जून 2022 चालू घडामोडी – Current Affairs

20 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (20 जून 2022)

कोकण रेल्वे विद्युतीकरणाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण :

  • कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा राष्ट्रार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे होणार आह़े
  • या रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, मडगाव आणि उडपी या तीन स्थानकांवर दुपारी 2.45 वाजता हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे.
  • ‘भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण मिशन – शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल’ या योजनेअंतर्गत लोकांना पर्यावरणपूरक, हरित आणि स्वच्छ वाहतुकीचे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी देशातील संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • यामध्ये कोकण रेल्वेच्या 741 किलोमीटर लांबीच्या मार्गाचा समावेश आहे.
  • त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील मार्ग 382 किलोमीटर, गोवा 163 किमी, तर कर्नाटकातील मार्ग 294 किलोमीटर आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 जून 2022)

‘अग्निपथ’भरती प्रक्रियेबाबत तिन्ही दलांची घोषणा :

  • देशभर हिंसक विरोध झालेल्या वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा व्यापक कार्यक्रम जाहीर केला.
  • त्याचबरोबर, ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारे बंद असतील असा इशाराही दिला.
  • ‘अग्निपथ’मध्ये भरती होताना अर्जदार तरुणांना, या योजनेच्या विरोधातील जाळपोळीत सामील नसल्याचे किंवा आंदोलनात भाग घेतला नसल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे.
  • तसेच प्रत्येक उमेदवाराची पोलीस पडताळणी करण्यात येईल.
  • एखाद्याविरुद्ध गुन्हा (एफआयआर) दाखल असेल, तर त्याला भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असेही लेफ्टनंट जनरल पुरी यांनी नमूद केले.

अग्निवीरांना निमलष्करी दलांत 10 टक्के आरक्षण :

  • ‘अग्निपथ’ या अल्पकालीन सैन्यभरती योजनेविरोधातील असंतोष तीव्र होत असल्यामुळे शनिवारी केंद्र सरकारने भावी अग्निवीरांना सवलती देऊ करून त्यांचा संताप शमवण्याचा प्रयत्न केला.
  • संरक्षण, गृह, शिक्षण, जहाज आणि बंदर विकास आदी मंत्रालयांनी विविध तरतुदी जाहीर केल्या.
  • संरक्षण मंत्रालय, निमलष्करी दलांत 10 टक्के आरक्षणाबरोबरच अन्य सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने सामावून घेण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
  • ‘अग्निपथ’मध्ये सैन्यदलांत फक्त चार वर्षांची नोकरी आणि निवृत्तिवेतनाचा अभाव या दोन प्रमुख त्रुटींमुळे तरुणांमध्ये या योजनेविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला असून देशभर हिंसाचार उफाळला आहे.
  • तसेच, खासगी क्षेत्रांत नोकरी मिळवण्यासाठी आणि कारकीर्द घडवण्यासाठी शैक्षणिक व आर्थिक मदत करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
  • केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत तटरक्षक दल तसेच, संरक्षण क्षेत्रातील पदांमध्ये आणि 16 सरकारी कंपन्यांमध्ये दहा टक्के नोकऱ्या अग्निवीरांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा संरक्षण मंत्रालयाने केली आहे.
  • शिवाय, गृहमंत्रालयानेही पोलीस दलांमध्ये दहा टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचे जाहीर केले आहे.
  • ‘र्मचट नेव्ही’तही नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
  • ‘अग्निपथ’च्या सैन्यभरतीमध्ये पहिल्या वर्षी कमाल वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवली आहे.
  • चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरांना विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
  • शिक्षणासाठी तसेच, उद्योजकतेसाठीही आर्थिक साह्य दिले जाणार आहे.

पंतप्रधानांच्या उपस्थितीत बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी क्रीडा ज्योतीच्या दौडीला प्रारंभ :

  • आगामी 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित क्रीडा ज्योतीच्या दौडीला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेंडा दाखवला.
  • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) प्रथमच ऑलिम्पिकच्या धर्तीवर क्रीडा ज्योतीच्या दौडीचे आयोजन केले आहे.
  • यंदा भारताला पहिल्यांदा बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे यजमानपद भूषवण्याची संधी लाभणार आहे.
  • ही स्पर्धा 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत चेन्नईजवळील महाबलीपुरम येथे खेळण्यात येईल.
  • बुद्धिबळ ऑलिम्पियाडची क्रीडा ज्योत पुढील 40 दिवसांत भारतातील 75 शहरांमध्ये नेण्यात येणार आहे.
  • यंदा भारतात होणाऱ्या ऑलिम्पियाड स्पर्धेत 188 देशांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

कनिष्ठ आशियाई स्क्वॉश स्पर्धात अनाहत सिंगची सुवर्णकमाई :

  • भारताची उदयोन्मुख स्क्वॉशपटू अनाहत सिंगने रविवारी कनिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेतील मुलींच्या 15 वर्षांखालील गटामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली.
  • थायलंडमधील पटाया येथे झालेल्या या स्पर्धेत 14 वर्षीय अनाहतने हाँगकाँगच्या क्वोंग एनावर अंतिम सामन्यात 3-0 अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
  • सामन्याच्या सुरुवातीपासूनच अनाहतने आक्रमक खेळ करत प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही व सामना सरळ तीन गेममध्ये जिंकला.
  • अनाहतने आतापर्यंत 46 राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या असून दोन राष्ट्रीय अजिंक्यपदे आणि दोन आंतरराष्ट्रीय जेतेपदेही तिने पटकावली आहेत.
  • अमेरिकन आणि ब्रिटिश या कनिष्ठ गटांतील दोन स्पर्धा जिंकणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे.

आठ वर्षांच्या कालावधीसाठी सादर केले तीन पॅकेज :

  • गेल्याच आठवड्यात भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचे माध्यम हक्क विकले.
  • तीन दिवस चाललेल्या या ई-लिलावाद्वारे बीसीसीआयला विक्रमी 48 हजार 390 कोटी रुपये मिळाले.
  • बीसीसीआय पाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनेदेखील माध्यम हक्क विक्रीसाठी निविदा खुल्या केल्या आहेत.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) 20 जूनपासून माध्यम हक्क निविदा विकरण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.
  • या निविदा 2024 पासून पुढील आठ वर्षांच्या कालावधीमध्ये होणाऱ्या 711 सामन्यांसाठी असतील.
  • आयसीसी एकूण तीन पॅकेज सादर करणार आहे. या पॅकेजमध्ये महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकाचाही समावेश आहे.
  • याशिवाय, पुरुष आणि महिला सामन्यांसाठी स्वतंत्रपणे बोली आयोजित केली जाणार आहे.

दिनविशेष :

  • 20 जून हा दिवस जागतिक शरणार्थी दिन म्हणून पाळला जातो.
  • इंग्लंडच्या राणीपदी 20 जून 1837 मध्ये व्हिक्टोरिया यजमान झाल्या.
  • देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव सी.एस.टी.) हे 20 जून 1887 रोजी सुरू झाले.
  • 20 जून 1921 मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली.
  • महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना 20 जून 190 मध्ये झाली.
  • महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ 20 जून 1997 रोजी सुरू झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 जून 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.