1857 चा उठाव व महाराष्ट्र

1857 चा उठाव व महाराष्ट्र

1. रंगो बापुजी गुप्ते

  • सातार्‍याचा राजा प्रतापसिंह याचा वकील.
  • प्रतापसिंहचे सरकार खालसा होवू नये म्हणून प्रयत्न केला.
  • यासाठी सतत इंग्लंड मध्ये 12 वर्ष वास्तव्य
  • इंग्रजांनी मागणी मान्य न केल्यामुळे भारतात परतल्यावर इंग्रजांविरुद्ध सशस्त्रं उठावाची योजना रंगो बापूजीने बनवली.
  • मांग, रामोशी, कोळी, यांना भरती करून छुपे सैन्य उभारले.
  • सातारा व महाबळेश्वर येथे उठावाची योजना होती.
  • परंतु उठाव फसला, योजना यशस्वी झाली नाही.
  • रंगो बापुजी गुप्ते पळून जाण्यास यसस्वी.

2. नानासाहेब व तात्या टोपे :

  • इंग्रजांविरुद्ध 1857 च्या उठावात भाग
  • 18 एप्रिल 1859 – तात्या टोपेला फाशी
  • उत्तरेकडील 1857 च्या उठावाला मराठी माणसांनी नेतृत्व पुरविले.

कोल्हापुरातील उठाव: :

  • 1. जुलै 1857 – 21 व्या आणि 28 व्या रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांचा उठाव.
  • 2. डिसेंबर 1857 – कोल्हापूर छत्रपतीला लहान भाऊ चिमा साहेबाच्या नेतृत्वाखाली उठाव, बेळगाव, धारवाडा, कोन्हार परिसरातील हिंदी शिपायांनी योजना आखली
  • पण हा उठाव फसला.
  • वरील दोन्ही उठाव मोडून काढण्यात पोर्तुगीज सेनापती जेकबने सहाय्य केले.

जमाखिंडी संस्थानातील उठाव :

  • आप्पासाहेब पटवर्धन यांचा सहभाग
  • बेकायदेशीर शस्त्रसाठा जमा करून ठेवल्याबद्दल अटक व राजपद काढून घेतले.
  • 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार आप्पासाहेबांची सुटका व राजपद परत मिळेल.

मुधोळमधील बेरडांचा उठाव :

  • 1857 ल लागू केलेल्या शस्त्रबंदी कायद्यानुसार भारतीयांना विनापरवाना शस्त्र वापरण्यास बंधी घातली.
  • या शस्त्रबंदी कायद्याच्या विरुद्ध मुधोळमधील बेरडांनी उठाव केला.
  • बेरडांना सार्वजनिक ठिकणी फाशी देण्याचे तंत्र इंग्रजांनी वापरले.

सुरगाणा संस्थान मधील उठाव :

  • सुरगाणा संस्थानचा राजा नीळकंठराव भगवंतराव पवार यांनी भिल्ल व कोळी लोकांना हाताशी धरून उठाव घडवून आणला.
  • इंग्रजांनी उठाव मोडून काढला.
  • पेठच्या राजाला फाशी दिली.

खानदेशातील भिल्लाचा उठाव: :

  • सातपुडा भागात
  • नेतृत्व – काजीसिंग, भागोजी नाईक, शंकरसिंह
  • 1500 पेक्षा अधिक भिल्ल सहभागी
  • सरकारी खजिना लुटला
  • इंग्रजांनी उठाव मोडून काढला

औरंगाबादेतील उठाव :

  • औरंगाबादेतील घोडदळाच्या पलटणीत मुस्लिम बहसंख्य
  • मुघल बादशाहाविरुद्ध उत्तरेकडे लढाईसाठी जाण्यास ब्रिटिश घोडदळातील मुस्लिम सैनिक नाखुन होते.त्यामुळे उठाव केला.
  • नेतृत्व – फिदाअली

नागपूरमधील उठाव :

  • नागपूरमधील मराठे मंडळींची उठावाला फूस
  • युरोपीयन अधिकार्‍यांची दारूगोळा, तोफा हस्तगत करणे, सीताबर्डीचा किल्ला हस्तगत करणे असे उठावाचे पूर्वनियोजित स्वरूप होते.
  • या उठावाला भोसले कुळातील बाकाबाई हिचा विरोध
  • बाकाबाई सारखी माणसे देशद्रोहि राहिल्यामुळे उठाव फसला.
  • निकष :
  • – 1857 च्या उठावात मराठी जनतेने भाग घेतला असला तरी त्याचे सहभागीत्व अत्यंत मर्यादित होते. ते महाराष्ट्राच्या विशिष्ट भागापुरते मर्यादीत होते. या भागात राष्ट्रीयत्वाच्या – – भावना तेवड्या प्रखरतेने उदयास आल्या नव्हत्या.
  • – परकीय राजवटीविरुद्ध चीड, संताप, हा प्रामुख्याने संस्थानिकांत राज्य गमावलेल्या वर्गात होता.आदिवासी जमातीत होता.

– 1857 च्या उठावात मराठी माणसांनी नेतृत्व पुरविले.

नारायण मल्हार जोशी :

  • कामगार नेते
  • All India trade union congress च्या स्थापनेत पुढाकार – 1920
  • AITUC चे 1925 ते 1929 या काळात general secretary होते.
  • 1931 मध्ये जोशींनी AITUC सोडली & All India Trade union Federation ची स्थापना केली.
  • AITUC मध्ये डाव्यांचे प्रमाण वाढल्यामुळे म्हणून जोशींनी ALTUC सोडली.

भारतातील कामगार चळवळ :

  • 1850 ते 1900 भारतातील कामगार वर्गाच्या उदयाचा कालखंड. या काळात ब्रिटीशांनी भारतात औद्योगिकीकरणास प्राधान्य दिले नाही. त्यामुळे भारतात औद्योगिक विकासाचा वेग कमी होता पर्यायाने कामगार वर्गाची संख्या कमी होती.
  • 1900 ते 05 नंतर ब्रिटिशांनी त्यांच्या गरजेतून भारतीय भांडवलदारांचा औद्योगिक कारखाने उभारण्यास प्रोत्साहन दिले. यानंतर भारतात औद्योगिक कारखाने स्थापन करायला चालना मिळाली पर्यायाने कामगार वर्गाची संख्या वाढली.
  • 1920-All India trade union congress ची स्थापना

नारायण मेघाजी लोखंडे

  • जन्म – 1848 ठाणे
  • भारतातील कामगार चळवळीचे प्रणेते.
  • महात्मा फुलेचे अनुयायी होते.
  • Bombay mill hands Association ची स्थापना – 1881 ला.

महाराष्ट्रातील शेतकरी उठाव :

  • 1857 – पुणे व अहमदनगर, सातारा जिल्ह्यात या प्रदेशात अस्तित्वात असलेली महसुलाची पद्धती-रयतवारी
  • रयतवारी पद्धतीचा दोषाप्रमाणे या भागातील शेतकरी सावकारांच्या तावडीत सापड्लेले
  • या भागातील सावकार बाहेरून आलेले मारवाडी, गुजराती होते.
  • 1860 च्या दशकात पूर्वार्धात अमेरिकेतील यादवी युद्धमुळे कापसाची निर्यात वाढल्याने कापसाचे भाव वाढत गेले.
  • 1964 मध्ये यादवी युद्ध संपल्यावर कापसाची निर्यात कमी होवून कापसाचे भाव कोसळले त्यामुळे शेतकरी संकटात सापडला
  • शेतकर्‍यांच्या अडचणीचा कायदा घेवून सावरकरांनी जमिनी बाळकवायला सुरवात केली
  • सावरकर हेच आपल्या दुर्दशेचे कारण आहे असे शेतकर्‍यांचे ठाम मत बनले.
  • उठावाची सुरवात – डिसेंबर 1874, करडे गाव तालुका शिरूर
  • सावकारांवर सुरवातीला शांततापूर्न सामाजिक बहिष्काराचे तंत्र वापरण्यात आले.
  • सामाजिक बहिष्काराचा फारसा परिणाम होत नाही हे लक्षात आल्यावर शेतकर्‍याच्या बहिष्काराचे रूपांतर दंग्यामध्ये झाले
  • सावकारांकडील गहाणखाते, न्यायालयाचे हुकूमनामे, सर्व कर्जविषयक दस्ताऐवज हस्तगत करून त्याची सार्वजनिक होळी करण्यात येई.
  • चळवळीत हिंसाचार फारसा झाला नाही.
  • उठावाचा रोख ब्रिटिश सरकारविरूद्ध नव्हता तर स्थानिक सावकारांविरुद्ध होता.
  • ब्रिटीशांनी कारवाही करून उठाव दडपून टाकला.
  • शेतकर्‍यांमधील असंतोष शांत करण्यासाठी 1879 डेक्कन “Agriculturist Releif Act” करण्यात आला.
  • व शेतकर्‍यांना सावकारांपासून काही प्रमाणात संरक्षण देण्यात आले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.