31 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2022)
घटनापीठाच्या प्रक्रियेसंबंधीच्या पैलूंवर 6 सप्टेंबरला निर्णय :
आर्थिक मागासवर्गीयांना (ईडब्ल्यूएस) नोकरी आणि प्रवेशांसाठी दहा टक्के आरक्षण देण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या संवैधानिक वैधतेची तपासणी सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ करणार आहे.
मुस्लिमांना आरक्षण देण्यासंदर्भातील राज्याचा स्थानिक कायदा रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल याचिकांवर सुनावणी करण्याआधी सर्वोच्च न्यायालय ही पडताळणी करणार आहे.
सरन्यायाधीश उदय लळित, न्या. दिनेश महेश्वरी, न्या. रवींद्र भट्ट, न्या. बेला एम. त्रिवेदी व न्या. पारदीवाला या पाच जणांच्या घटनापीठाने स्पष्ट केले,की या संदर्भातील प्रक्रियागत पैलू व अन्य तपशिलांबाबत घटनापीठ 6 सप्टेंबर रोजी निर्णय घेईल व 13 सप्टेंबरला आरक्षणासंदर्भातील याचिकांवर सुनावणी करेल.
केंद्र सरकारने 103 व्या घटनादुरुस्तींतर्गत अधिनियम 2019 अंतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल वर्गासाठी (ईडब्ल्यूएस) दाखले, प्रवेश आणि नोकरीत आरक्षणाची तरतूद केली होती.
अब्जाधीश गौतम अदानी यांनी लुई व्हिटॉनचे अध्यक्ष आणि सीईओ बर्नार्ड अर्नॉल्ट यांना मागे टाकून ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत टॉप 3 मध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.
हा मान मिळवणारे अदानी हे आशिया खंडातील पहिले व्यावसायिक ठरले आहेत.
विशेष म्हणजे चीनचे जॅक मा आणि भारताचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना सुद्धा आजवर हे करणे शक्य झालेले नाही.
प्रतिष्ठित श्रीमंतांच्या यादीत टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्यापाठोपाठ अदानी यांनी तिसरे स्थान पटकावले आहे.
अदानी यांच्या संपत्तीत +1. 12 अब्ज डॉलरची शेवटची वाढ दिसली होती.
जुलै 2022 मध्ये, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांना मागे टाकून अदानी 113 अब्ज डॉलर्ससह जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती बनले होते.
रोहित शर्मा हाँगकाँग विरुद्ध जिंकताच ‘हा’ महत्त्वाचा विक्रम रचणार :
संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करून जोरदार सुरुवात केली आहे.
आता 31 ऑगस्टला टीम इंडिया हाँगकाँगशी आमने सामने येणार आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिय येथे भारत विरुद्ध हॉंगकॉंग सामना पार पडणार आहे.
हा सामना भारतीय संघाला महत्त्वाचा असणार आहे कारण या सामन्यात विजयी झाल्यास टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
रोहितने 18 चेंडूत केवळ 12 धावा केल्या पण तरीही T20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत 3499 धावांसह रोहित दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.
आशिया कप सामन्यातील कर्णधार म्हणून प्राप्त केलेले 6 विजय हे सर्वाधिक असून हा विक्रम एमएस धोनी आणि मोईन खान यांच्या नावे आहे.
जर हाँगकाँग विरुद्धचा सामना भारताने जिंकला तर सात विजयांसह रोहित शर्मा या यादीत प्रथम क्रमांकावर येईल.
दिनविशेष :
31 ऑगस्ट हा दिवस बालस्वातंत्रदिन आहे.
मृत्युंजय कादंबरीचे लेखक प्रसिद्ध साहित्यिक ‘शिवाजी सावंत‘ यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 मध्ये झाला.
सन 1947 मध्ये 31 ऑगस्ट रोजी भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली.
पांडुरंगशास्त्री आठवले यांना सन 1996 मध्ये मॅगसेसे पुरस्कार प्रदान झाले.
राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांच्या हस्ते सन 1970 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे उद्घाटन झाले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.