भारतातील समाजसुधारक

भारतातील समाजसुधारक

  • सफाई कामगारांचा बादशहा असे बाबा आमटे यांना महात्मा गांधी यांनी म्हंटले होते.
  • भ्रष्ट्राचार विरोधी जनआंदोलन न्यास या संस्थेचे प्रमुख – समाज सेवक अण्णा हजारे आहेत.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये वास्तव्य केलेले 3 मजली निवासस्थान महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व न्याय मंत्रालयाने 24 सप्टेंबर 2015 रोजी विकत घेतले.
  • ही 3 मजली इमारत लंडन शहरात 10 किंग हेंरीज रोड येथे 2050 स्क्वे. फुट क्षेत्रफळ असणारी आहे.
  • आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था स्थापन करणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची समाधी सातारा येथे आहे.
  • अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष – डॉ. श्याम मानव.
  • 30 सप्टेंबर 2015 रोजी केंद्र सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे टपाल तिकीट प्रकाशित केले.
  • डॉ. रविंद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे हे दाम्पत्य अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी भागात कुपोषण कमी करण्यासाठी तसेच आरोग्य सुविधा देण्यासाठी अखंडितपणे कार्यरत आहे.
  • डॉ. राजेंद्रसिंह राणा – यांना भारताचे जलदूत म्हणून ओळखले जाते.
  • त्यांनी राजस्थानमध्ये अरवली पर्वतातील लहान मोठे बंधारे/जोहड बांधून जलपुर्नभरण केले. तसेच त्यांनी अरवरी या नदीचे पुर्नजीवन केले.
  • राजेंद्रसिंह राणा यांची स्वयंसेवी संस्था – तरुण भारत स26 ऑगस्ट 2015 रोजी स्विडन मधील स्टॉकहोम येथे स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट संस्थेचा स्टॉकहोम वॉटर प्राईज हा पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.