Current Affairs (चालू घडामोडी) of 13 March 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. स्वच्छ भारत अभियानाचे पुढचे पाऊल
2. भाग्यश्री योजनेचे उद्घाटन
3. प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली प्रथम क्रमांकावर
4. दिनविशेष
 

स्वच्छ भारत अभियानाचे पुढचे पाऊल :

  • स्वच्छ भारत अभियानांतर्गत आगामी पाच वर्षात देशभरात 6.84 कोटी शौचालये बांधण्यात येणार आहेत.
  • या शौचालयांच्या बांधनीसाठी अंदाजे 1,34,386 कोटी रुपये लागणार आहेत.
  • स्वच्छतामंत्री विरेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

भाग्यश्री योजनेचे उद्घाटन :

  • सुकन्या योजनेत बदल करून मुलींसाठी भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचे उद्घाटन केले.
  • या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणार्‍या प्रत्येक मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत.
  • अभिनेत्री भाग्यश्री या योजनेची ब्रॅंड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

प्रदूषित शहरांमध्ये दिल्ली प्रथम क्रमांकावर :

  • जागतिक आरोग्य संघटनेने जगातील सर्वाधिक प्रदूषित वीस शहरांच्या प्रसिद्ध केलेल्या यादीत तेरा शहरे भारतातील आहेत.
  • यामध्ये दिल्ली प्रथम क्रमांकावर तर बीजिंग दुसर्‍या क्रमांकावर आहे.

दिनविशेष :

  • 1781सर विल्यम हर्शोल याने युरेनस ग्रहाचा शोध लावला.
  • 1997 –  कोलकात्यातील मिशनरीज ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांच्या वारसा म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली.
  • 2003मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.